चेतन सिंह याच्या पत्नीची 11 तास कसून चौकशी, रेणू सिंह यांनी काय सांगितलं पोलिसांना?
रेल्वे दुर्घटनेला 6 दिवस उलटून गेले, मात्र अद्यापपर्यंत जीआरपी यामागील कारणाबाबत कोणताही निष्कर्ष काढू शकलेले नाही. जीआरपी समोर अनेक प्रश्न आहेत.
![चेतन सिंह याच्या पत्नीची 11 तास कसून चौकशी, रेणू सिंह यांनी काय सांगितलं पोलिसांना? चेतन सिंह याच्या पत्नीची 11 तास कसून चौकशी, रेणू सिंह यांनी काय सांगितलं पोलिसांना?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/06131338/chetan-singh-2.jpg?w=1280)
मुंबई | 6 ऑगस्ट 2023 : जयपूर-मुंबई पॅसेंजरमध्ये चार प्रवाशांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या करणाऱ्या चेतन सिंह याला पोलिसांनी अटक केली आहे. पण आजाराचा बहाणा सांगून तो पोलीस तपासात सहकार्य करत नाहीये. त्याची पत्नी रेणू सिंह ही मुंबईत आली असून तिची 11 तास कसून चौकशी करण्यात आली आहे. तिची कसून चौकशी झाल्यानंतर तिची लिखित साक्ष नोंदवून घेण्यात आली आहे. यावेळी रेणूने अत्यंत महत्त्वाची माहिती पोलिसांना दिल्याचं सांगितलं जातं.
शनिवारी सकाळी 11 वाजता रेणू सिंह उत्तर प्रदेशातून मुंबईत आली होती. यावेळी तिला बोरिवली जीआरपी कार्यालयात नेण्यात आले. पोलिसांच्या सुरक्षेत तिला जीआरपी कार्यालयात आणण्यात आले. त्यानंतर तिची कसून चौकशी करण्यात आली. यावेळी तिला चेतन सिंह याचा स्वभाव आणि त्याच्या आजाराबाबत पोलिसांनी माहिती विचारली. तिनेही चेतनच्या आजाराशी संबबंधित माहिती पोलिसांना दिली आहे. याशिवाय त्याच्या आजाराशी संबंधित कागदपत्रेही तिने पोलिसांना दिली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/04133900/prakash-ambedkar-58.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/04125124/WhatsApp-Image-2023-01-14-at-10.44.55-AM-1.jpeg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/04123220/Uday-Samant-15.jpg)
तपासात सहकार्य नाही
दुसरीकडे चेतन सिंह पोलिसांना तपासात सहकार्य करत नाहीये. तो वारंवार आपली साक्ष बदलून जीआरपीला संभ्रमित करण्याचा प्रयत्न करत आहे. तो आजाराचा बहाणा बनवत आहे. त्याची न्यूरोलॉस्टकडे ट्रीटमेंट सुरू आहे. त्याचे मेडिकल डिस्क्रिप्शनही पोलिसांना मिळाले आहेत.
टार्गेट किलिंग?
दरम्यान, रेल्वे दुर्घटनेला 6 दिवस उलटून गेले, मात्र अद्यापपर्यंत जीआरपी यामागील कारणाबाबत कोणताही निष्कर्ष काढू शकलेले नाही. जीआरपी समोर अनेक प्रश्न आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जीआरपीने आपल्या तपासातून टार्गेट किलिंगचा अँगल नाकारला नाही, मात्र या अँगलच्या तपासात असा प्रश्न उपस्थित होत आहेत. आरोपी चेतन सिंहने टार्गेट किलिंग केली असेल तर त्याचा सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) टिकाने राम मीनाला का मारले? हा प्रश्न जीआरपीला सर्वाधिक सतावत आहे.
नेमकं काय घडलं?
31 जुलै रोजी सोमवारी पहाटे 5 ते सव्वा पाचच्या सुमारास जयपूर-मुंबई पॅसेंजरमध्ये चेतन सिंह याने त्याचे वरिष्ठ अधिकारी टीकाराम यांच्यावर गोळीबार केला होता. दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर त्याने हा गोळीबार केला होता. त्यात टीकाराम यांच्यासह चौघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याने पॅसेंजरमधून उडी मारून पलायन करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याला अटक केली होती.