Astrology: ‘या’ राशींचे लोकं प्रेमात खातात सर्वाधिक धोका; दुधाने तोंड भाजल्याने ताकही फुंकून पितात!
प्रेम हे प्रत्येकाच्या आयुष्यातले सुंदर आणि नाजूक वळण असते. या वळणार मिळणारे अनुभव आयुष्यात बरंच काही शिकवून जाते. अनेकांना त्यांनी ज्यांच्यावर प्रेम (Love astrology) केले त्यांची साथ आयुष्यभर लाभते तर काहींना यात धोका मिळतो(cheating in relationship). प्रेमात विश्वासघात झाल्याच्या जखमा आयुष्यभर ताज्याच असतात. आयुष्य विरहाच्या गर्तेत हरवून जाते. त्याचमुळे परत एखाद्यवर विश्वास ठेवणे कठीण होऊन […]
![Astrology: 'या' राशींचे लोकं प्रेमात खातात सर्वाधिक धोका; दुधाने तोंड भाजल्याने ताकही फुंकून पितात! Astrology: 'या' राशींचे लोकं प्रेमात खातात सर्वाधिक धोका; दुधाने तोंड भाजल्याने ताकही फुंकून पितात!](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/07/04234746/love-horoscope.jpg?w=1280)
राशी भविष्य
प्रेम हे प्रत्येकाच्या आयुष्यातले सुंदर आणि नाजूक वळण असते. या वळणार मिळणारे अनुभव आयुष्यात बरंच काही शिकवून जाते. अनेकांना त्यांनी ज्यांच्यावर प्रेम (Love astrology) केले त्यांची साथ आयुष्यभर लाभते तर काहींना यात धोका मिळतो(cheating in relationship). प्रेमात विश्वासघात झाल्याच्या जखमा आयुष्यभर ताज्याच असतात. आयुष्य विरहाच्या गर्तेत हरवून जाते. त्याचमुळे परत एखाद्यवर विश्वास ठेवणे कठीण होऊन जाते. जोतिष्यशास्त्रात अशा काही राशी आहेत ज्या प्रेमात धोका खातात. त्यानंतर या लोकांसाठी परत एखाद्यवर विश्वास ठेवणे कठीण होते. जाऊन घेऊया या राशी कोणत्या आहेत.
- कुंभ रास- कुंभ राशीचे लोग स्वभावाने चांगले असतात. याचा अनेकदा गैरफायदा घेतल्या जातो. कुंभ राशीचे लोकं पटकन एखाद्यावर विश्वास ठेवतात. ज्याच्यावर प्रेम करतात त्यांच्याशी ते एकनिष्ठ असतात. अशात त्यांना प्रेमात धोका मिळाल्याने ते पूर्णपणे खचून जातात. परत एखाद्यवर विश्वास ठेवणे त्यांच्यासाठी कठीण होऊन जाते.
- मिथुन रास- मिथुन राशीचे लोकं स्वभावाने हळवी असतात. त्यांच्या हळवेपणाचा अनेकदा गैरफायदा घेतला जातो. या राशीचे लोक अनेकदा प्रेमात धोका खातात. प्रेमभंगाचे दुःख हे लोकं आयुष्यभर विसरू शकत नाही.
- वृश्चिक रास- एखाद्यावर मनापासून प्रेम करण्यामध्ये वृश्चिक राशींच्या लोकांचा हात कोणीच धरू शकत नाही. प्रेमासाठी हे लोकं वाट्टेल तो त्याग करायला तयार असतात. अशात या राशीच्या लोकांना प्रेमात धोका मिळाल्याने ते परत कुणावरच मनापासून प्रेम करू शकत नाही.
- मीन रास- या राशींचे लोकं स्वभावाने शांत असतात. प्रेमात धोका मिळाल्यानंतर ते सर्व दुःख मनातल्या मनातच ठेवतात. प्रेमभंगाचे दुःख त्यांच्या काळजाच्या आत घर करून बसलेले असते.
- मकर रास- या राशीचे लोकं नात्यांना फार महत्त्व देतात. हे लोकं कधीच हातचे राखून नातं निभावत नाही. या राशीचे लोकं प्रेमात बऱ्याचदा धोका खातात. प्रेमप्रकरणात विश्वासघात झाल्याने ते संपूर्ण आयुष्य जड मानाने जगतात.
हे सुद्धा वाचा
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/07/02225928/tulsi.jpg)
Spiritual: तुळशीने हे संकेत दिले तर समजून जा तुमचे चांगले दिवस सुरु होणार
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/07/02214711/indian-husband.jpg)
Astrology: ‘या’ चार राशींचे पुरुष असतात आदर्श पती; नशीबवान मुलींनाच मिळतो असा नवरा
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/07/02160939/astrology-2.jpg)
Astrology: जुलै महिन्यात ‘या’ तीन राशींवर बरसणार लक्ष्मीची कृपा; आर्थिक समस्या सुटणार!
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/07/01153510/angry-zodiac-sign.jpg)
Astrology: ‘या’ राशीचे लोक असतात प्रचंड रागीट; पैसा, नाते, मान-सम्मान सगळं गमावतात
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
Non Stop LIVE Update