आशिया कपला सुरू व्हायला अवघे दोन दिवस बाकी आहेत. पाकिस्तानकडे यंदाच्या आशिया कपचं यजमानपद आहे मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सामने श्रीलंका आणि पाकिस्तानमध्य खेळवले जाणार आहेत. अशातच पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रम याने आशिया कपबाबत भविष्यावाणी केलीये.
आशिया कपमध्ये प्रत्येक संघाला हे समजेल त्यांचे गोलंदाज 10 ओव्हर गोलंदाजी करू शकतात की नाही. कारण टी-20 क्रिकेट आता मोठ्या प्रमाणात खेळलं जात आहे. यंदाचा आशिया कप हा 50 ओव्हरचा आहे ही चांगली गोष्ट असल्याचं वसीम अक्रम म्हणाला.
एसीसी (एशियन क्रिकेट कौन्सिल) 50 ओव्हरच्या फॉरमॅटमध्ये आयोजित केला. मागील आशिया कप हा 20 ओव्हरचा खेळवण्यात आला होता. वसीम अक्रम याने आशिया कप जिंकण्याच्या रेसमध्ये श्रीलंका, भारत आणि पाकिस्तान या तीन संघांची नावे घेतली आहेत.
मागे मी बोललो होतो की भारत-पाक फायनल होईल पण श्रीलंकेने आशिया कप जिंकला होता. त्यामुळे सर्वांसाठी ही संधी असणार असून अफगाणिस्तान आणि बांगलादेश या संघानाही कमी लेखून चालणार नसल्याचं वसीम अक्रम म्हणाला.
दरम्यान, २ सप्टेंबरला हाय-व्होल्टेज भारत-पाक सामना होणार आहे. या सामन्याकडे क्रिकेट जगताचं लक्ष लागून असणार आहे.