Akshaya Tritiya 2023 : अक्षय तृतीयेला जुळून येत आहे 7 विशेष महायोग, हा एक उपाय बनवू शकतो मालामाल

| Updated on: Apr 13, 2023 | 2:31 PM

अक्षय्य तृतीया हा विवाह, गृहप्रवेश, मुंडण करणे, नवीन व्यावसाय सुरू करणे इत्यादींसाठी एक शुभ दिवस आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सतयुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचे मानले जाते.

Akshaya Tritiya 2023 : अक्षय तृतीयेला जुळून येत आहे 7 विशेष महायोग, हा एक उपाय बनवू शकतो मालामाल
अक्षय तृतीया
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : अक्षय तृतीया (Akshaya tritiya 2023) महापर्व हा वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी केलेले शुभ कार्य अक्षय फळ देते, म्हणून लोकं या दिवशी सोने-चांदी, घर-गाडी इत्यादी खरेदी करतात. अक्षय्य तृतीया हा विवाह, गृहप्रवेश, मुंडण करणे, नवीन व्यावसाय सुरू करणे इत्यादींसाठी एक शुभ दिवस आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी सतयुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचे मानले जाते. यावेळी 22 एप्रिलला अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे. तसेच यावेळी अक्षय्य तृतीयेला अनेक शुभ संयोग घडत आहेत. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढले आहे.

अक्षय तृतीयेला शुभ योग

22 एप्रिल 2023 रोजी अक्षय्य तृतीयेला अर्धा डझनहून अधिक शुभ योग तयार होत आहेत. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चंद्र वृषभ राशीत उच्च असेल. तसेच सूर्याच्या मालकीचे कृतिका नक्षत्र राहील. याशिवाय अमृत सिद्धी योग, रवि योग, सर्वार्थ सिद्धी योग, सौभाग्य योग, त्रिपुष्कर योग आणि आयुष्मान योग देखील अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तयार होत आहेत. अशाप्रकारे अनेक शुभ योग एकत्र करून केलेल्या महायोगात केलेले उपासना-उपाय व्यक्तीच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतात.

अक्षय तृतीया पूजेचा शुभ मुहूर्त

अक्षय्य तृतीयेच्या पूजेचा सर्वात शुभ मुहूर्त शनिवार, 22 एप्रिल रोजी सकाळी 7.49 ते दुपारी 12.20 पर्यंत राहील. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा नियमानुसार करा. असे केल्याने अपार संपत्ती मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात.

हे सुद्धा वाचा

यासाठी अक्षय्य तृतीयेच्या पहाटे उठून स्नान करावे व नंतर पिवळे वस्त्र परिधान करावे. यानंतर गंगाजलाने  अभिषेक करून ईशान्य दिशेला एक पद ठेवा. त्यावर पिवळ्या रंगाचे कापड पसरवा आणि नंतर भगवान विष्णू-माता लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र ठेवा. चांदीच्या भांड्यात गंगाजल घेऊन त्यात केशर टाकून चंदन तयार करा. त्यानंतर हे केशर चंदन भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला लावा आणि नंतर उरलेले चंदन कपाळावर लावा. यानंतरही जर चंदन उरले असेल तर ते ठेवा आणि जेव्हाही तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी जाल तेव्हा कपाळावर याचा टिळा लावा. हे उपाय केल्यावर तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुम्हाला खूप सुख, समृद्धी आणि प्रगती लाभेल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)