Temperature : आताचा उन्हाळाच एवढा त्रासदायक, आणखी 60 वर्षांनी कसं असेल मुंबई-पुण्याचं चित्र? काय असेल सरासरी तापमान?
तापमानात झालेल्या प्रचंड वाढीमुळे ही मृत्यूची घंटा ही बनू शकते. अशी लाट ही सार्वजनिक आरोग्य आणि अर्थव्यवस्थेसाठी घातक आहे. यामुळे इकोसिस्टमलाही धोका निर्माण होतो. अशी परस्थिती ओढावत असतानाही आपण जर यावर काही कृती केली नाही तर याचे परिणाम काही काळामध्येच भोगावे लागतील असे मत ग्रीनपीस इंडियाचे मोहीम व्यवस्थापक अविनाश चंचल यांनी व्यक्त केले आहे.
![Temperature : आताचा उन्हाळाच एवढा त्रासदायक, आणखी 60 वर्षांनी कसं असेल मुंबई-पुण्याचं चित्र? काय असेल सरासरी तापमान? Temperature : आताचा उन्हाळाच एवढा त्रासदायक, आणखी 60 वर्षांनी कसं असेल मुंबई-पुण्याचं चित्र? काय असेल सरासरी तापमान?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/14160232/temprature-n.jpg?w=1280)
मुंबई : दिवसेंदिवस (Climate Change) हवामानातील बदल हा वाढत चालला आहे. गत काही वर्षापासून त्याची प्रचिती येत आहे पण भविष्यात यापेक्षा बिकट स्थिती होणार असल्याचा अंदाज (आयपीसीसी) या हवामान संस्थेने वर्तवला आहे. बदलत्या हवामानाला घेऊन ग्रीनपीस इंडियाने 6 अहवाल विशिष्ट परिस्थितीच्या आधारे उष्णतेच्या लाटेच्या अंदाजांचे केले आहेत. यामध्ये (Mumbai) मुंबई आणि पुण्याच्या तापमानात कमालीची वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या दोन्ही शहराचे सरासरीचेच (Temperature Increase) तापमान 5 अंश सेल्सिअसने वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. समुद्र किनाऱ्यालतच्या शहरांना उष्णतेचा धोका अधिक असतो. त्यानुसार मुंबई आणि पुण्याचे प्रदूषण हे 2050 पर्यंत दुप्पट होईल अशीच सध्याची स्थिती आहे. भौगोलिक रचनेमुळे अंतर्देशीय असूनही पुण्याचा पॅटर्न तुलनेने वेगळा आहे, यावर प्रकाश टाकताना अहवालात म्हटले आहे की, “उष्णतेच्या लाटेच्या वेळी अंतर्देशीय शहरांमध्ये तापमानात वाढ होत असल्याने किनारपट्टीच्या भागात तापमानात कमी फरक जाणवेल.मात्र, समुद्रातील आर्द्रतेमुळे मुंबईसारख्या शहरांमध्ये हवामानाची परिस्थिती निर्माण होईल.” असे अहवालात म्हटले गेले आहे.
उष्णतेची लाट आरोग्यासाठी अन् अर्थव्यवस्थेसाठी घातकच
तापमानात झालेल्या प्रचंड वाढीमुळे ही मृत्यूची घंटा ही बनू शकते. अशी लाट ही सार्वजनिक आरोग्य आणि अर्थव्यवस्थेसाठी घातक आहे. यामुळे इकोसिस्टमलाही धोका निर्माण होतो. अशी परस्थिती ओढावत असतानाही आपण जर यावर काही कृती केली नाही तर याचे परिणाम काही काळामध्येच भोगावे लागतील असे मत ग्रीनपीस इंडियाचे मोहीम व्यवस्थापक अविनाश चंचल यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे वेळीच योग्य ती पावले उचलली तर हे संकट रोखता येऊ शकते. पण त्यादृष्टीने कोणत्या हालचाली दिसून येत नाही ही शोकांतिका आहे.
असुरक्षित समुदायावर सर्वाधिक परिणाम
वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक परिणाम हा समाजातील असुरक्षित म्हणजेच गरीब किंवा ज्यांना निवाऱ्याची सोय नाही यांच्यावर होणार आहे. जे घराबाहेर काम करतात मग यामध्ये स्त्रिया, मुले, ज्येष्ठ नागरिक, लैंगिक अल्पसंख्याक यांचा समावेश होतो. कारण यांना संरक्षणात्मक उपायच उपलब्ध नसतात. त्यामुळे समाजातील अशा नागरिकांची संख्या कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न कऱणे गरजेचे आहे. शिवाय सार्वजनिक आरोग्य व्यवस्था ही मजबूत केली पाहिजे. नागरिकांनी सतर्क रहावे म्हणून सातत्याने हवामान संस्थांशी साधणे गरजेचे आहे.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/14180647/New-Project-25-2.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/14174844/New-Project-2022-05-14T121831.048.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/05/14171459/New-Project-2022-05-14T114448.593.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/04/17223706/Wheat-Crop.jpg)
तापमान कमी करण्यासाठीचे ‘उपाय’
आता तापमानात घट आणने ही जबाबदारी बनली आहे. त्यामुळे झाडे लावा, झाडे जगवा हे केवळ घोषणेपुरते मर्यादित न ठेवता कम्युनिटी न्यूट्रिशनल गार्डन, उद्याने, मिनी फॉरेस्ट, रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांचे आच्छादन आणि पाणवठे ही काळाची गरज आहे. यामुळे दीर्घकाळ तापमानाचे प्रमाण कमी राहणार आहे. 60 वर्षानंतर मुंबई-पुणे पाठोपाठ दिल्लीच्या सरासरी तापमानात 4 अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे. याशिवाय, तापमानवाढीमुळे लखनौ, पाटणा, जयपूर आणि कोलकाता या शहरांवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.