Eknath Shinde: ‘अशा धमक्या अनेकवेळा’, सुरक्षतेबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याची धमका देण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. यातच दसरा मेळावा तोंडावर आला आहे. असे असतानाच या धमकीबद्दल मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया महत्वाची आहे.
![Eknath Shinde: 'अशा धमक्या अनेकवेळा', सुरक्षतेबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? Eknath Shinde: 'अशा धमक्या अनेकवेळा', सुरक्षतेबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/10/02221320/Youtube-89.jpg?w=1280)
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांना एका पत्राद्वारे ही धमकी (Threat) देण्यात आली असून यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. यापूर्वीही अशा धमक्या आल्या आहेत. त्यामुळे त्याला मी भीक घालत नाही. धमक्यांमुळे मला जनतेमध्ये जाण्यापासून कोणी रोखूही शकणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. त्याच बरोबर गृहविभागाचे (Home Department) अधिकारी हे योग्य ती सुरक्षतेची काळजी घेत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
एकनाथ शिंदे यांना यापूर्वीही अशा धमक्या आल्या होत्या. नक्षलवादी यांच्याकडूनही अशी धमकी आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गडचिरोलीचे पालकमंत्री असताना असा प्रसंग ओढावला होता. त्यामुळे हे काही माझ्यासाठी नवीन नसल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
मला जनतेमध्ये राहण्यास आवडते.अशा धमक्यांमुळे माझ्या वागण्यात कोणताही बदल होणार नाही. शिवाय जनतेमध्ये जाण्यास मला कोणीही रोखू शकणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. अशा बाबींचा परिणाम यापूर्वीही झालेला नाही आणि भविष्यातही होणार नसल्याचे ते म्हणाले आहेत.
मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याच्या धमकी पत्रानंतर गृहविभागाने सुरक्षतेची योग्य ती काळजी घेण्यास सुरवात केली आहे. त्याअनुषंगाने गृहविभागाला सूचनाही देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी ही पत्राद्वारे देण्यात आली होती. आतापर्यंत तब्बल तीन वेळेस त्यांना अशाप्रकारची धमकी देण्यात आली आहे. गडचिरोलीचे पालकमंत्री असतानाही असा प्रसंग घडला होता.
सुरक्षतेच्या दृष्टीने गृहविभाग हे सक्षम आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्रीही राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांनी सुरक्षतेच्या दृष्टीने योग्य त्या सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे समोरच्याने अशा धमक्याही देऊ नयेत असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.