मनसेचे पुढील टार्गेट कोण? राज ठाकरे यांचे ते ‘सात’ शिलेदार काढणार ‘जागर’ यात्रा

| Updated on: Aug 26, 2023 | 3:05 PM

मुंबई गोवा महामार्गावर मनसेचे आंदोलन सुरूच आहे. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गणपतीपूर्वी रस्त्याचे काम पूर्ण होईल असे आश्वासन दिले असले तरी मनसे या कामावर लक्ष ठेवून असणारा आहे. त्याची जबाबदारी मनसेने सात नेत्यांवर सोपविली आहे. हे सात नेते आता जागर यात्रा काढणार आहेत.

मनसेचे पुढील टार्गेट कोण? राज ठाकरे यांचे ते सात शिलेदार काढणार जागर यात्रा
MNS Raj Thackeray
Follow us on

मुंबई : 26 ऑगस्ट 2024 | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई – गोवा महामार्गावरून राज्यातील युती सरकारवर जोरदार टीका केली होती. मुंबई गोवा महामार्गावर आतापर्यंत १५,६६६ कोटी रुपये खर्च झाले. 13 वर्र्ष काम सुरु आहे. तरीही रस्ता होत नाही? या पैशांमधून काहींच्या तुंबड्या भरल्या गेल्या. कोकणाचा विकास होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करतंय का? असा थेट सवाल त्यांनी केला होता. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मनसैनिकांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणाऱ्या चेतक सन्नी कंपनीची तोडफोड केली. मनसैनिकांच्या या आंदोलनानंतर आता मनसे नेतेही ‘या’ रणांगणात उतरणार आहेत. मनसेचे सात नेते कोकणात जागर यात्रा काढणार आहेत. या जागर यात्रेत हे सात नेते मुंबई – गोवा महामार्गाचा भांडाफोड करणार आहेत. एकूण सात टप्प्यांमध्ये ही यात्रा पार पडणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महत्त्वाच्या सात नेत्यांवर ही जाबाबदारी सोपविली आहे. यामध्ये अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, अभिजीत पानसे, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत आणि संदीप देशपांडे यांचा समावेश आहे. ही यात्रा संपल्यानंतर राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने या यात्रेची सांगता होणार आहे.

हे सुद्धा वाचा

मनसेच्या या जागर यात्रेची अधिक माहिती देताना सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितले, जागर यात्रेसाठी आम्ही आज निघणार आहोत. जाता जाता फेसबुक पेजवरून लाईव्ह करणार आहे. मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी काय कामे चलू आहेत, कोणती कामे चालली आहेत ते आम्ही दाखवून देऊ. त्यामध्ये कसं थूकपट्टी लावून काम केले जाते हे ही आम्ही जनतेसमोर आणू.

नाचता येईना अंगण वाकडे

भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आम्हाला आंदोलन कसं करायचं ते शिकवू नये. कसं आंदोलन करायचं ते आम्हाला माहित आहे. कुठे, कुठल्या पद्धतीने आंदोलन करायचं हे त्यांच्याकडून शिकण्याची गरज नाही. त्यांची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे अशी आहे.

मनसेच्या आंदोलनामुळे मुंबई गोवा महामाग्राचे काम रखडले असे ते म्हणतात. पण, आम्हाला दोष देऊन स्वताचे पाप लपवू नका. झालेल्या कामामध्ये भेगा पडल्या. ते ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळेच झाले की भिकारी कॉन्ट्रॅक्टदारामुळे झाले असा सवाल त्यांनी केला.

नागरिकांचा एकत्र करण्याचे काम

कुणी बहिरा झाला असेल तर आपण त्यांच्याशी मोठ्याने बोलतो. तसेच काही लोक बहिरे झाले असतील तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या कानाखाली आवाज काढेल, असा इशाराही त्यांनी दिला. आम्ही जागर यात्रा सुरू केली आहे ते नित्कृष्ठ दर्जाचे झालेले काम जनतेपुढे मांडण्यासाठी आहे. जागर मांडून नागरिकांचा एकत्र करण्याचे काम ही यात्रा करणार आहे, असेही देशपांडे यांनी सांगितले.