Palghar Crime : चार दिवसापासून बेपत्ता चालकाचा अखेर शोध लागला, सत्य समोर येताच सर्वांनाच धक्का बसला !
नेहमीप्रमाणे कार चालक गाडीवर गेला होता. तीन भाडेकरुंना नाशिकला घेऊन गेला तो परतलाच नाही. चार दिवस घरच्यांनी शोधाशोध केल्यानंतर अखेर शोध लागला.
![Palghar Crime : चार दिवसापासून बेपत्ता चालकाचा अखेर शोध लागला, सत्य समोर येताच सर्वांनाच धक्का बसला ! Palghar Crime : चार दिवसापासून बेपत्ता चालकाचा अखेर शोध लागला, सत्य समोर येताच सर्वांनाच धक्का बसला !](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/palghar-youth-death.jpg?w=1280)
पालघर / 15 ऑगस्ट 2023 : भाडे घेऊन गेलेला तरुण अचानक बेपत्ता झाला. चार दिवस घरचे आणि पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. मात्र त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. अखेर चार दिवसांनी पोलिसांचा शोध थांबला आणि चालक सापडला. पण तो मृतावस्थेत आढळला. त्र्यंबकेश्र्वरच्या हद्दीत अंबोली घाटात चालकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. आसिफ असे मयत चालकाचे नाव आहे. आसिफची कार घेऊन भाडेकरु फरार झाले. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. आसिफचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
काय घडलं नेमकं?
सदर कार पालघरमधील गणेश नगर परिसरातील महेश सूर्यवंशी यांच्या मालकिची आहे. शनिवारी पालघारहून नाशिक येथे तीन भाडेकरुंना घेऊन महेश यांचा चालक निघाला होता. शनिवारी संध्याकाळी 4 च्या सुमारास पलघारहून नाशिक जाण्यासाठी निघाला होता. मात्र भाडं नाशिकपर्यंत असताना नाशिकच्या पुढील टोलवरील टोल फास्टटॅगने पैसे कट झाल्याने गाडी मालक महेश सूर्यवंशी यांना संशय आला. त्यांनी चालक आसिफ घाची याला फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र आसिफने फोन उचलला नाही. बराच वेळ आशिफचा फोन लागत नव्हता.
यानंतर गाडीचं लोकेशन तपासलं असता दुसऱ्या दिवशी रविवारी ही गाडी थेट छत्तीसगड येथे पोहचल्याचं गाडी मालक महेश सूर्यवंशी यांच्या निदर्शनास आलं. मात्र छत्तीसगडमधील एका टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता गाडीतील चालक आसिफ घाची नसून दुसराच माणूस गाडी चालवत असल्याने पालघर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/gold-loan-fraud.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/crime-scene-1-1.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/08/kalyan-gavathi-katta.jpg)
चालक आसिफ घाची यांच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार पालघर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस सर्वत्र आसिफचा शोध घेत होता. या दरम्यान आज दुपारी 2 च्या सुमारास आसिफ घाचीचा कुजलेल्या अवस्थेत शव त्र्यंबकेश्र्वरच्या हद्दीत अंबोली घाटात मिळून आला. पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकरणाचा तपास सुरु आहे.