मुंबई, २८ ऑगस्ट २०२३ | अजित पवार आमच्या सोबत आले म्हणून खोके वाल्यांचे तोंड बंद झालेत. असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उद्देशून केलं. इतकंच नाहीत आताचं तीन पक्षाचं सरकार कसं आहे याची नवी व्याख्याही गुलाबराव पाटील यांनी केली. गुलाबराव पाटील यांचा जळगावात कार्यक्रम होता. ते खोक्यांच्या आरोपांवरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना उद्देशून बोलल्याचे पाहायला मिळाले. मात्र यापूर्वी कार्यकर्त्येच नव्हे तर विरोधात असताना अजित पवार यांनीही शिंदे गटावर खोक्यांची टीका करत होते. सत्तेत गेल्यानंतर हे त्रिशुल आणि ट्रिपल इंजिनचं सरकारचा दावा नेत्यांनी केला. मात्र ‘डोकं भाजपचं, कंबर सेनेचं आणि पाय राष्ट्रवादीचे’ असं आताचं सरकार आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले. बघा जळगावातील जाहीर सभेत गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले…