Sushma Andhare | ‘देवेंद्र फडणवीस हे पपेट ऑफ RSS’, सुष्मा अंधारे यांनी वापरले अत्यंत टोचणारे शब्द

| Updated on: Aug 10, 2023 | 2:20 PM

Sushma Andhare | संजय शिरसाट, बांगर, किशोर पाटील, अब्दुल सत्तार या लोकांच एकच क्वालीफिकेशन 'उर्मटपणा'. ते त्यांची ओरीजनल क्वालिटी दाखवत आहेत" अशी टीका सुष्मा अंधारे यांनी केली.

Sushma Andhare | देवेंद्र फडणवीस हे पपेट ऑफ RSS, सुष्मा अंधारे यांनी वापरले अत्यंत टोचणारे शब्द
Sushma Andhare-devendra fadnavis
Follow us on

मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या नेहमीच आपल्या भाषणातून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत असतात. खासकरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्या नेहमीच बोचरी टीका करतात. गुरुवारी पुन्हा एकदा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं. देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत जहरी टीका केली. “देवेंद्र फडणवीस हे पपेट ऑफ आरएसएस आहेत. ते RSS चे कळसूत्री बाहुली आहेत. त्यांना गोळकवलकारांना महापुरुषांच्या यादीत आणून बसवायचं आहे” असं सुष्मा अंधारे म्हणाल्या.

“देवेंद्र फडणवीसांना कलंक म्हटलं, तेव्हा भाजपाचे बावनकुळे, शेलार, लाड तुटून पडायचे. आता महापुरुषांचा अपमान होताना कुठं आहेत?” असा सवाल अंधारे यांनी केला.

‘अजित पवार आता कौतुक करतात’

“मुख्यमंत्र्यांनी अमित शाहंच कौतुक करणं म्हणजे, उंदराला मांजर साक्षी असं आहे. हेच मुख्यमंत्री भाजपसोबत राहू शकत नाही म्हणायचे, हेच अजित पवार एक एक उद्योग बाहेर गेला म्हणून टिका करायचे, तेच अजित पवार आता कौतुक करतात” असं सुष्मा अंधारे म्हणाल्या.

‘श्रीकांत शिंदे यांनी हनुमान चालीसा म्हणून प्रश्न सुटणार आहेत का?’

“मग हेच लोक आधीचे लोक खरे की आताचे खरे हा प्रश्न पडतो?. श्रीकांत शिंदे ,भाजपा आक्रस्ताळेपणा करते. श्रीकांत शिंदे यांनी हनुमान चालीसा म्हणून प्रश्न सुटणार आहेत का?. मलाही हनुमान चालीसा येते” असं अंधारे म्हणाल्या. “शिरसाट, बांगर, किशोर पाटील, अब्दुल सत्तार या लोकांच एकच क्वालीफिकेशन आहे उर्मटपणा. ते त्यांची ओरीजनल क्वालिटी दाखवत आहेत” अशी टीका त्यांनी केली.

स्मृती इराणी आता धमक दाखवणार का?

“स्मृती इराणी सोयीस्कर राजकारण करतात. ज्या स्मृती इराणी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंगांना निर्भया प्रकरणावरून साडीचोळीचा आहेर पाठवला, त्याच इराणी आता मणिपूरवरून आहेर पाठवणार का ? धमक दाखवणार का ? त्यांना प्रसिद्धी हवी असते म्हणून सोयीस्कर बोलत असतात” अशी टीका अंधारे यांनी केली.